परवा माझ्या प्राथमिक शाळेतल्या एका मित्राचा फोन आला. लॉकडाऊनमुळे दोघांनाही बराच वेळ होता. अनेक वर्षांनी खूप गप्पा झाल्या. बोलता बोलता तो म्हणाला, अरे मध्यंतरी तुक्या गेला. तुक्या आमचा वर्गमित्र. एकेका यत्तेत दोन दोन तीन तीन वर्ष काढल्यामुळे चौथीत असताना जेव्हा तो आमच्या वर्गात आला, खरं सांगायचं तर आम्ही त्याच्या वर्गात गेलो, तेव्हा आमच्यापेक्षा दुप्पट उंचीचा व लांबीरुंदीचा होता. आम्ही चौथी पास झालो त्यावर्षी तो परत नापास झाला. तुक्याचा बाप म्हादूनाना. झालं तेव्हढं शिक्षण बास झालं असं म्हणून असं म्हणून म्हादूनानानं त्याला कुणाच्यातरी ओळखीतनं कुठेतरी पिंपरी चिंचवडकडे कारखान्यात लावून दिला. रोज जायला यायला लांब पडतं या सबबीवर तुक्या तिकडंच कुठेतरी राहायला गेला. नंतर फारसा कधी दिसला, भेटलाही नाही. म्हादूनाना मात्र आमच्याच गल्लीत रहात होता. आमच्या गल्लीतलं एक पोर असं नसेल ज्याला म्हादूनाना माहीत नाही. याचं कारण म्हणजे म्हादूनाना वह्यापुस्तकांना अतिशय छान, सुबक अशी कव्हरं घालून द्यायचा. कव्हराचे कागद ज्यानं त्यानं आपापले आणायचे. मग कुणी जुनी वर्तमानपत्रं घेऊन यायचा, कुणी ...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.