मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

2019 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जरा विसावू या वळणावर....

अनेक महिने गाजत असलेला, आपल्या प्रशालेचा सुवर्णमहोत्सव परवा रविवारी पार पडला. नेटकं संयोजन, शिस्तबद्ध स्वयंसेवक व प्रसंगानुरूप कार्यक्रम असा हा सोहळा होता. आपल्याला त्याचं फारसं नवल वाटलं नाही. कारण तो प्रबोधिनीचा कार्यक्रम होता. तो तसाच असणार हे आपल्याला सगळ्यांना माहीत होतं. तशी आपल्याला सवयच होती. मात्र यापूर्वीच्या अनेक कार्यक्रमांपेक्षा हा कार्यक्रम खूप काही दाखवून गेला. गेले अनेक महिने, त्यातही गेले काही दिवस, आपले वर्गमित्र, महामहिम, वयोवृद्ध, पितामह योगेश देशपांडे यांनी मुरारबाजी व बाजी प्रभू या दोन्ही देशपांड्यांच्या ताकतीने व हिरीरीने या कार्यक्रमाचा प्रचार चालवला होता. योग्या, अरे आता बास, आम्ही येणार आहोत असं अनेकवेळा सांगूनही पितामह ऐकायला तयार नव्हते. पण या भानगडीत कार्यक्रमाबाबतची उत्सुकता मात्र जाम ताणली गेली. पहिल्या झटक्यातच सर्व शिक्षकजनांबरोबरचा संवादाचा कार्यक्रम मनाला हळवं करून गेला. ज्या गुरुजनांना अखंड त्रास दिला, ते सर्व पाठीवरून हात फिरवून, किती रे मोठे झालात सगळे, असं म्हणत होते ना त्यावेळी डोळ्यातलं पाणी लपवायला फार प्रयत्न करावे लागले. दीपाताई, मुक्तीत

अल्बम

आपण जेव्हा एखादी वस्तू शोधत असतो त्यावेळी हटकून आधी कधीतरी हवी असलेली व त्यावेळी न सापडलेली वस्तू सापडतेच. किंवा अशी काही वस्तू सापडते की मूळ वस्तूचा पूर्ण विसर पडून तिचा शोध बाजूला पडतो व नवीन वस्तूच आपला ताबा घेते.     असाच सकाळी ड्रॉवर मधे काहीतरी शोधताना हिला तिच्या कॉलेजच्या ट्रीपच्या फोटोंचा अल्बम सापडला. झालं. तश्या पसाऱ्यात बसल्या जागी अल्बम बघणं व प्रत्येक फोटोची आठवण सुरू झाली. मीही म्हणलं तर ऐकतोय म्हणलं तर ऐकत नाहीये अशा स्ट्रॅटेजिक परीस्थितीत होतो. म्हणजे तिच्या कॉलेजच्या मैत्रिणी वगैरे रम्य आठवणी असतील तर ऐकत होतो. मामा, मावशी असलं काही सुरू असेल तर ऐकत नव्हतो. जवळजवळ एक तास ती तशीच आठवणींच्या पसाऱ्यात बसून होती. मूळ विषय बाजूलाच पडला होता. पण त्याची तिला फिकीर नव्हती. दुनियाभरच्या चांगल्या वाईट आठवणी काढून, काहीशी स्वतःतच हरवलेलीशी, ती पुन्हा कामाला लागली. तिचं ते अल्बम पहाणं मला मात्र विचारांच्या भोवऱ्यात अडकवून गेलं. अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानापासून मुक्त असे ते दिवस होते. मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हतं. त्यामुळे येताजाता सेल्फ्याही नव्हत्या आणि लाईक्स व अंगठेही

भिंतीवरील (उ)फराटे

फेसबुकवर अकाउंट उघडून तशी मला अनेक वर्षं झाली. फेबुवर नक्की कसल्या व कशासाठी पोष्टी टाकायच्या हेच मला कळत नव्हतं. त्यामुळे तो अकाउंट तसाच पडून होता. पण सुमारे एक वर्षांपूर्वीपासून पोष्टी टाकायला सुरुवात केली. झालं काय की आमच्या सोसायटीच्या हस्तलिखित मासिकात काही फुटकळ लिखाण करत होतो. सुमारे दोन वर्षात ते मासिक बंद पडलं. पण लिखाणाचा किडा चावला तो चावलाच. म्हणून मग हा ब्लॉग लिहायला लागलो. मग कुणीतरी सुचवलं की हे सगळं फेबुवर टाक. त्या गोष्टी फेबुवर टाकता टाकता इतर पोष्टीही टाकू लागलो. पोष्टी टाकल्यात म्हणताना लोक कॉमेंट्स टाकू लागले. अंगठे, स्मायल्या वगैरेतर पोत्यानं मिळू लागल्या. फेबुवर नक्की काय करतात हा प्रश्न आता मागे पडला.  मधल्या काळात वपुंचं 'प्लेझर बॉक्स' वाचनात आलं. वाचकांची आलेली पत्रं व त्यांच्या प्रतिक्रिया यांचं अतिशय सुंदर संकलन व विश्लेषण वपुंनी केलं आहे. त्याकाळी पोष्टानं पत्र येत. त्यामुळे त्या पत्रपेटीला 'प्लेझर बॉक्स' असं अत्यंत समर्पक नावही वपुंनी दिलं. तसं खूप पूर्वी ते वाचलं होतं. पण त्यावेळी मी 'बा वाचका'च्या पामर भूमिकेत होतो. मधल्या का

अस्पष्टाचा हुंकार

मनात एक द्वंद्व. प्रस्थापितांची मक्तेदारी पटवून घ्यायची का त्याविरुद्ध उभं ठाकून विस्थापित व्हायचं. सगळं काही असह्य होतंय. काहीतरी करायला हवं. कोणी एक पैशाच्या हव्यासापोटी आले. कोणी व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते झाले. कोण हे टिकोजीराव? यांना हाकलायलाच पाहिजे. काहीतरी करायला हवं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. अचानक कोणीतरी कोणालातरी मारलं. का मारलं माहीत नाही. पण घरदार माझं जळालं. त्याला मारलं म्हणून माझं घरदार का जाळलं? माहीत नाही. काहीतरी करायला हवं. दैवयोगे कुठेतरी उकिरड्यावर जन्माला आलो. आजूबाजूच्या खातेऱ्यातून बाहेरतर पडायचंय, पण काही मूठभर परत तिथेच ढकलताहेत. काहीतरी करायला हवं. नकाशावर दाखवताही येणार नाही अशा एका जगात ते रहातात. साधा ताप आला तरी देवऋषाकडे जाऊन  जादूटोणा करतात. साध्या साध्या आजारात किडामुंगीसारखे मरतात. काहीतरी करायला हवं. प्रतिस्पर्धी फॉर्मात आहे. जिंकायच्या ईर्ष्येने पेटला आहे. बाकीचे सहकारी खचतात की काय असं वाटतंय. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं. काहीतरी करायला हवं.... हा असतो अस्पष्टाचा हुंकार... अंतरीच्या या हुंका

दोन ओंडक्यांची होते... (उत्तरार्ध)

पुलंनी एके ठिकाणी म्हणलंय की युनिफॉर्म घातला की साधा बॅंडवालापण टर्रेबाजी करतो. माझेही बहुतांशी अनुभव तसेच आहेत. आता युनिफॉर्म घातल्यामुळे टर्रेबाजी करायला हुरूप येतो का विशिष्ट काम करताना येणाऱ्या अनुभवांमुळे तसं वागलं जातं हा वेगळा विषय आहे. बट फॅक्ट रिमेन्स. मात्र अपवादात्मक का होईना, युनिफॉर्म मधल्या काही चेहऱ्यांबद्दलच्या माझ्या आठवणी पुष्कळ वेगळ्या आहेत. आठवणींच्या वादळात कितीतरी ओंडके आज एका लाटेनं जवळ येताहेत व दुसऱ्या लाटेनं लांब जाताहेत. लहानपणापासून ज्याची आपल्याला भीती घातली जाते तो पहिला युनिफॉर्म म्हणजे पोलीस. गप जेव नाहीतर पोलिसाला बोलवीन, या व अशा अनेक धमक्या आपण ऐकलेल्या असतात. त्यामुळे कुठेही पोलीस दिसला की पोटात बाकबुक होतंच. त्यात चित्रपटांमधे पाहिलेले पोलीस यात आणखी भरच घालतात. नंतरच्या काळात काही पोलीस मित्रही झाले, तसेच काही वर्गमित्र पोलीस झाले. त्यामुळे नाण्याची दुसरी बाजूही कळली. पण जो पोलीस माझ्या लक्षात आहे तो खूप वेगळा आहे. ह्या पोलिसाला मी पाहिलं त्याकाळी हवालदार मंडळी हाफ पॅन्ट व पठाणी सॅंडल घालून, पोटऱ्यांना खाकी रंगाच्या पट्ट्या गुंडाळत असत. सुट्टी

दोन ओंडक्यांची होते...

लहानपणापासून माणसांचं निरीक्षण करण्याचा मला छंदच आहे. वेगवेगळी माणसं, त्यांचे हावभाव, लकबी, वेषभूषा यांचं निरीक्षण करून विविध वैशिष्टयांच्या मनात नोंदी करत रहाणं हा माझा एक आवडता टाईमपास आहे. गेले बरेच आठवडे मी अशा वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल लिहीत होतो. मागल्या आठवड्यात नुसत्या चेहऱ्यांबद्दल लिहिले. असे चेहरे की ज्या मागचा 'माणूस' मला माहीत नाहीये, पण जे मी अनेक वेळा पाहीले होते. काही चेहरे मात्र असे आहेत की जे मी एकदाच पाहीलेत आणि दोनशे टक्के ते चेहरे पुन्हा मी कधीही पाहणार नाहीये. हे चेहरे एकदाच दिसण्याचं मुख्य व एकमेव कारण म्हणजे ह्या चेहऱ्यांना मी प्रवासात भेटलोय. सुमारे पाच मिनिटांपासून अठरा वीस तासापर्यंतचाच सहवास. पण काही ना काही कारणानं हे चेहरे व त्यामागचा माणूस, माझ्या आठवणींच्या विश्वात अढळ स्थान मिळवून बसलेत. ह्या यादीत सर्वप्रथम येतो सायकलवरून जाणारा एक मध्यमवयीन गृहस्थ. मी व माझा मित्र काही कारणानं मोरगावमार्गे बारामतीला चाललो होतो. त्याकाळी माझ्याकडे सेकंडहँड फियाट होती. मोरगाव मागे टाकून पुढे निघालो, तेवढ्यात दोन गचके खाऊन गाडी बंद पडली. बरीच खाडखूड करूनही चालू

भंवताल

दोन तीन दिवसांपूर्वी एका शब्दप्रयोगाबद्दल काही शंका होती म्हणून नेटवर सर्फिंग करत होतो. त्या भानगडीत एक वेगळीच माहिती हाताला लागली. ती अशी की, सर्वसामान्यपणे एक माणूस त्याच्या आयुष्यात तीस लाख चेहरे बघतो. त्यातील जास्तीत जास्त तीन हजार चेहरे माणसाच्या लक्षात राहतात. जी माणसं लोकांमध्ये वावरतात ती तर जवळजवळ साडेचार कोटी चेहरे बघतात म्हणे. आता नेटवर काय, कुठल्याही विषयावर काहीही माहिती मिळते. पण ह्या माहितीच्या तुकड्याने माझ्या डोक्यात मात्र विनाकारण चक्र फिरवायला सुरुवात केली. सगळ्यात मोठा गोंधळ झाला तो असा की आपल्या लक्षात नक्की राहतं काय? चेहरे की माणसं? जास्त विचार केल्यावर असं लक्षात आलं की चेहरा ही कुठल्याही माणसाची आयडेंटिटी असते. विशिष्ट चेहऱ्यामुळेच विशिष्ट व्यक्ती आपल्या लक्षात राहतात. बघा ना, केवळ चेहऱ्यामुळेच आपल्याला माधुरी दीक्षित आणि मायावती यांच्यातला फरक कळतो. तसं नसतं तर.... अरे बापरे.... ह्या सगळ्या विचारांच्या गर्दीत मी एकेक चेहरे आठवू लागलो. काय काय प्रकार सापडले बघा. आईवडील, नातेवाईक, शेजारपाजारचे, गल्लीतले, सोसायटीतले,  शाळाकॉलेजमधले, ऑफिसमधले, विविध दुकानदार,

वेव्हलेंग्थ

 आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला एखादा माणूस असा भेटतो की ज्याला आपण आधी कधी पाहिलेलंही नसतं. पण काही वेळातच वर्षानुवर्षांची ओळख असल्यागत धागे जुळतात. सोप्या मराठीत सांगायचं तर 'वेव्हलेंग्थ' जुळते. त्या दोघांची वेव्हलेंग्थ अशीच जुळली. दोघांपैकी जो मोठा होता त्याला तीन मुली होत्या. त्यापैकी थोरल्या दोघींची लग्न होऊन त्यांना पोरंही झाली होती. तिसरं शेंडेफळ जरा लाडोबा होतं. तिचंही लग्नाचं वय झालं होतं. बापानं आजवर जवळजवळ पंचवीस स्थळं आणली होती. पण हिला एक काही पसंत पडत नव्हतं. कोणी चम्याच आहे, तर कोणी राक्षस आहे. कोणाची आईच माकडीणीसारखी दिसतेय, तर कोणाचा बापच जाडभिंग्या आहे, असली कारणं सांगून नकारघंटा ठाणठाण वाजत होती. पण आपल्या ह्या अप्सरेगत शेंडेफळासाठी तो चपला झिजवत होता. अचानक एकेदिवशी शेंडेफळानंच त्याचा प्रॉब्लेम सोडवला. ऑफिसमधून येताना एकाला घेऊन आली व ह्याच्याशी मी लग्न करतेय म्हणून ओळख करून दिली. एकूण बरा वाटलं तो त्याला. पण शेवटी बापाचं काळीज होतं ते, काळजी तर वाटलीच. काळजी वाटणंही स्वाभाविक होतं. खूप कष्टातून तो पुढं आला होता. पाच बहिणींचा एकटा भाऊ होता तो.

तीन अ. ल. क. (अति लघु कथा)

अलक १. रोज संध्याकाळी घरी आल्याआल्या त्याला काहीतरी सटरफटर खायला लागतं. एरवी ती काहीतरी तयार ठेवतेच. पण आज तिचा उपास असल्यामुळे जाम कंटाळा आला होता. 'तूच येताना काहीतरी आण' असं सांगायला दोनदा फोन केला, पण 'व्यस्त' लागला. काहीतरी करायलाच पाहिजे याविचाराने ती किचनकडे वळली. तेव्हढयात बेल वाजली. तिनं दार उघडलं. आत येऊन त्यानं एक पुडकं तिच्या हातात ठेवलं व म्हणाला, आज तुझा उपास आहे ना म्हणून साबुदाणा वडे आणलेत.... डोळ्यात दाटलेल्या धुक्यात ते पुडकं कधीच दिसेनासं झालं होतं.... अलक २. रिपरिप पावसातच ती घराजवळच्या मंडईत गेली होती. भाजी तर मनासारखी मिळाली, पण तसल्या त्या चिकचिकटात जड पिशव्या उचलायचं आता जिवावर आलं होतं. तेव्हढ्यात मागून एका कोवळ्या पण दणकट हातानं त्या पिशव्या उचलल्या. "क्लासमधून आलो तर बाबा म्हणले तू मंडईत गेली आहेस, म्हणून आलो पटकन... ", तो म्हणाला... तिच्याच काळजाचा तो तुकडा आता तिच्या डोळ्यात मावत नव्हता.... अलक ३. शाळेत असल्यापासून मी खूप आळशी आहे. विशेषतः दीर्घोत्तरी प्रश्नांना दीर्घ उत्तर अथवा पंधरा मार्कांसाठी निबंध वगैरे लिहायचं

नंदी

पहायला गेलं तर तो होता एक अनामिक. पण खरं सांगायचं तर त्याला अनेक नावं होती. गावातले लोक त्याला कुठल्याही नावानं हाक मारत, पण त्याचं खरं नाव कुणालाच माहीत नव्हतं. कुणाला कशाला, खुद्द त्याला स्वतःलाही त्याचं स्वतःचं नाव माहीत नव्हतं. त्यातल्या त्यात शंकराच्या देवळातल्या गुरवीणबाईंनी ठेवलेलं 'नंदी' हे नाव पॉप्युलर होतं. नंदी इतका दुर्दैवी मी अद्याप कुठे पाहिला नाहीये. तो डोक्यानं थोडासा कमी होता. म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं तर तो थोडासा 'गतिमंद' होता. गावातल्या जुन्या लोकांना नक्की आठवत होतं की तो धनगरांच्या एका तांड्याबरोबर गावात आला. असेल तेव्हा तीन चार वर्षांचा. तांड्यातल्या मेंढ्यांमागे रानात फिरायचा. किंवा मग बापाचं बोट धरून बाप जाईल तिथं जायचा. सगळ्या गावाला ही बापलेकाची जोडी माहीत पडली होती. त्याची एक विचित्र सवय होती. मेंढ्यांमागे फिरता फिरता हा पोरगा कुठेही झोपून जायचा. त्या बापाला रोज संध्याकाळी ह्याला येड्याला शोधून आणायचं एक कामंच लागलं होतं. एक दिवस तो तांडा निघून गेला. पण कसा कुणास ठाऊक, हा मागंच राहिला. निघायच्या गडबडीत आईबाप ह्याला विसरले का कुठेतर

गिरणीवाली

"कशापाई येवडी राबतीया तू? ज्यानं चोच दिलीयं त्यो चारा बी दील..." कोणी एक मावशी गिरणीवाल्या बाईला दोन शब्द सुनावत होती. "अवं कमळीच्या आजी, चारा त्यानं दिला तरी तिथवर जायाला पंख तर पाखरालाच मारावे लागतात की..." गावातल्या आमच्या घराजवळच्या एका गिरणी कम दुकानातला हा संवाद गेली किमान चाळीस वर्षं माझ्या लक्षात असेल. कमळीच्या आजीला अशा तऱ्हेने उलटं सुनवायचा गिरणीवालीला पूर्ण हक्क होता. सारा आसमंत तिला गिरणीवाली बाई असंच म्हणायचा, कारण तिचा नवरा गिरणीवाला होता. माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या आळीच्या कोपऱ्यावर, एका मोठ्या गाळ्यात त्यांची पिठाची गिरणी होती. गाळ्याच्या एका भागात नवऱ्याची गिरणी व दुसऱ्या भागात गिरणीवाल्या बाईचं गोळ्या, बिस्किटं, पेन्सिली, वह्या, सिगरेटी, तंबाकू असं काहीबाही विकायचं फुटकळ दुकान होतं. गिरणीजवळच्याच एका वाड्यात त्यांचं बिऱ्हाड होतं. गिरणीवाला रोज सकाळी लवकर गिरणी उघडायचा ते पार रात्रीपर्यंत. गिरणीवाली बाई संसार सांभाळून जमेल तसं तिचं दुकान चालवायची. गुरुवारी गिरणीला सुट्टी असायची. त्या दिवशी दोघही जण जात्याच्या पाळ्यांना टाकी लावत बसलेले

पेटीवाला

पुणे शहरातील एका अत्यंत स्ट्रॅटेजिक अशा नाक्यावर वर्षानुवर्षं आमचा कट्टा होता. अत्यंत प्रसिद्ध अशा पेठेतल्या एका महत्वाच्या रस्त्याला तिरपी टांग मारून एक पुणेरी बोळ जात असे. बरोब्बर त्याच स्ट्रॅटेजिक पॉइंटला एका बाजूला खास पुणेरी हॉटेल, जिथे अतिशय छान कॉफी मिळत असे, तर दुसऱ्या बाजूला अत्यंत चविष्ट असा कांदा उत्तप्पा खिलवणारे उडप्याचे हॉटेल होते. पलीकडेच एक गायन क्लास होता. त्याच्या पायऱ्या हा आमचा कट्टा. इतर कुठल्याही कट्ट्याप्रमाणे वाच्य व अर्वाच्य गप्पा हा आमच्याही कट्ट्याचा मुख्य उद्योग असला तरी जुनी हिंदी गाणी, अभिनेते व अभिनेत्री, क्रिकेट व क्रिकेटपटू हेही विषय आम्हाला वर्ज्य नव्हते. विशेषतः जुनी हिंदी गाणी जर सुरू झाली तर आम्हाला भंकस करायलाही आठवण राहायची नाही. या सगळ्याव्यतिरिक्त रस्त्यावरून येणारी जाणारी लोकं हा ही एक मनोरंजनाचा व निरीक्षणाचा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा. क्वचित एखादेवेळी कट्ट्यावर एकटा जरी कोणी असेल तरी इतरजण येईपर्यंत नुसती लोकं बघण्यातही खूप वेळ जात असे. हातगाडीवाले, फेरीवाले, रिक्षावाले, सायकलवाले, नुकतीच लग्न झालेली जोडपी, म्हातारी जोडपी, आईच्या हात

सत्य, विपर्यास की दिशाभूल...???

मला पर्सनली ओळखणाऱ्या लोकांना माझ्या वाचनाच्या छंदाची पुरेपूर कल्पना आहे. हातात सापडेल ते पुस्तक वाचून काढणे यासारखा अत्यानंद नाही. त्यामुळे विविध विषयांवरची पुस्तके, तीही छापील, मी वाचत असतो. अशाच वाचनयात्रेत मध्यंतरी हातात पडले एक अनोखे पुस्तक. लेखकाचे नाव पहिल्यांदा ऐकले. विषय माहितीचा पण, पुस्तकाचे नाव जरा वेगळे, थोडेसे आव्हानात्मक असे. काय करावे? बघूया तरी काय लिहिलंय, असा विचार करून मी पुस्तक हातात घेतले. गेले सुमारे पंधरा दिवस मी वेळ मिळेल तसा पुस्तक वाचत गेलो. जसजसा पुढे जात होतो तसतसा 'भंजाळत' गेलो. पुस्तक वाचून संपल्यावर तर जी काय माझी या विषयाबद्दलची कल्पना होती, ती बदलून एक वेगळंच चित्र मनात उमटलं आहे. काय आहे हे पुस्तक? का मी गोंधळात पडलोय? तुम्हा सर्वांशी शेअर केल्याशिवाय चैन पडणार नाही.  हे ते पुस्तक. लेखक आहेत श्री. पराग वैद्य. शाळेत असताना 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' हे पुस्तक वाचले होते. दुसऱ्या महायुद्धाशी माझा परिचय झाला तो या पुस्तकामुळे. नंतरही वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर या पुस्तकाचे वाचन झाले. याविषयावरची इतरही अनेक पुस्तके वाचनात आ

मालिशवाले मामा

खूप लांबचा प्रवास करून आज घरी आलोय. अंग अगदी आंबून गेलंय. ताजंतवानं होण्यासाठी मसाज करून घ्यावा ह्या विचाराने जवळच्याच एका महागड्या स्पामधे निघालो आहे. मात्र मालिशवाल्या मामांची आठवण झाल्याशिवाय रहात नाहीये व त्यांच्या आठवणीनं डोळेही ओलावलेत..... माझी आणि मामांची ओळख तशी अचानकच झाली. अकरावी का बारावीत असताना एकदा खेळताना जोरात पडलो. त्या वयात तसं पडणं झडणं काही नवीन नव्हतं. पण ह्यावेळी जरा जोरातच पडलो. थोड्यावेळाने उठून पुन्हा खेळायला लागलो खरा, पण पाठच दुखायला लागली. घरी आलो व आईला सांगितलं. तिनं आपलं पाठीला तेल लाव, शेकून काढ, असले उपाय केले. पेनकिलरही दिली. पण पाठदुखी काही थांबेना. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांकडे निघालो होतो, तेव्हढ्यात आजोबांचे एक मित्र आले.  "डॉक्टरकडे रे कशाला चाललायंस? त्या मामाकडे जा आणि त्याला सांग काय ते. मस्त मालिश करून देईल की दहा मिनिटात उड्या मारत घरी येशील. जा, त्या मारुतीच्या पलीकडच्या वाड्यात रहातो तो. आणि माझं नाव सांग बरं का..."  थोडा विचार करून मीही डॉक्टरांकडे जाण्याऐवजी कोण त्या मामांकडे जायला निघालो. तिथे पोचलो तर एक म्हा

कट्ट्यावरले दिवस

स्थळ : बादशाहीचा बोळ , टिळक रोड , पेठ सदाशिव ( हे सांगायलाच पाहीजे का ?)... पुणे . वेळ : कुठलीही . काळ : साधारण पस्तीस वर्षांपूर्वीचा ... जेव्हा दहावीत पहिला येण्यासाठी ८० - ८५ टक्के मार्क्स पुरेसे असत ... जेव्हा कॉमर्सला जाण्यासाठी ६० टक्के पुरत ... जेव्हा पुण्यात मुख्यतः सायकली वापरल्या जात ... जेव्हा म्हातारी माणसे न भिता टिळक रोड क्रॉस करू शकत ... जेव्हा आमचे पोट आणि छाती एका रेषेत होती ... जेव्हा डोक्यावर भरपूर केस होते व ते काळे पण होते ... तो काळ .. हा कट्टा त्या जागीच का जमला ?   विशेष काही नाही . एक तर जागा अतिशय मोक्याची . बसायला एका गायन क्लासच्या पायऱ्या अथवा पुणेरी भक्कम नावाचे पण आकाराने बेताचे असे एक हॉटेल . आणि बोळातच पुढे एका मित्राचे घर . त्यामुळे बऱ्याच गोष्टींची सोय ... हा कट्टा ... सुरू झाला साधारण सनी देओल , अनिल कपूर , सिद्धू , मनोज प्रभाकर , वॉ बंधू , अम्ब्रोज , यांच्या उदयापासून ..... संपला साधारण ... नाही नाही ... नाही संपला ... आणि