लेखाचा विषय वाचल्या वाचल्या अनेकांच्या मनात पहिला विचार आला असणार की , ' हं , घ्या अजून एक ' गेले ते दिवस ' छाप गळा काढणारा लेख '. तसे जर कोणाला वाटले असेल तर खरोखर मला आश्चर्य वाटणार नाही . ह्या पद्धतीचे अनेक लेख दर दिवाळीत आपल्यासमोर येत असतात . म्हणून मग ठरवले की माझ्या व्यवसायानिमित्त कळलेले विषय , आलेले अनुभव ह्या अनुषंगाने दिवाळीकडे पहावे . ऐन दिवाळीत बाहेर देशात जावे लागल्यामुळे तिथे पाहिलेल्या दिवाळीबद्दल लिहावे . अनेक जण अनेक वेळा मला विचारतात की आपल्या देशात हे एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष ठेवण्याचा आचरटपणा का करतात ? सरळ कॅलेंडर इयर का नाही करून टाकत ? नवीन युगात तसे करायला काहीही हरकत नाहीये . पण एक लक्षात घेऊ की यात आचरटपणा मात्र अजिबात नाहीये . आपला देश हा एक शेतीप्रधान देश आहे . आज इतकी औद्योगिक प्रगती करूनसुद्धा देशातील बहुसंख्य जनता शेतीवरच अवलंबून आहे . नीट विचार केलात तर एक लक्षात येईल की एप्रिल ते मार्च हे आर्थिक ...
मन आणि च'मन'चिडी, कुठल्या दिशेला उडतील, ह्याचा नेम नाही. ह्या ब्लॉग द्वारे मनात येणारे कुठलेही विचार तुमच्याशी शेअर करणार आहे. एखादा लेख, फोटो, प्रसंग, कविता, बातमी, काहीही, कधीही, कुठेही, काय जे वाटेल ते.... आवडल्यास कृपया 'लाइक' करा व तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.