"कुठल्याहीSSS प्रकारचा पाण्याचा प्रवाSSS ह अथवा दोन उंचवट्यांमधीलSSS खोलगट भाग ओलांडण्याकरीताSSS पूल बांधला जातोSSS. पुलाचे अनेक प्रकार असताSSS त...."
परवा कुणीतरी चीन मधल्या कुठल्याशा काचेच्या पुलाची क्लिप पाठवली. ती बघता बघता अचानक मला प्राथमिक शाळेतला शेंडेबाईंचा चौथीचा वर्ग आठवला. विषय कुठलाही असो, एखादं गणित घालत असो किंवा भूगोल, शास्त्र, इतिहास यापैकी कशातलं तरी महत्वाचं वाक्य असो, मराठी शुद्धलेखन घातल्याच्या चालीवरच त्या सांगत असत. त्यांच्या त्या सांगण्याच्या पद्धतीची आम्हाला इतकी सवय होती की जर एखादं वाक्य त्यांनी असं तालासुरात सांगितलं नाही तर ते नक्कीच महत्वाचं नसणार असं आम्ही ठरवून टाकलं होतं. एकदा त्यांनी 'उद्या शाळेला सुट्टी आहे बरं का' असं साध्या वाक्यात सांगितलं, त्यावर कुणी काही रिऍक्शनच दिली नाही. जेव्हा त्यांनी परत, 'उद्याSSS शाळेलाSS सुट्टी आSS हे' असं सांगितलं, तेव्हा कुठे आमच्या डोक्यात प्रकाश पडला व आम्ही वर्ग डोक्यावर घेतला.
आज मात्र, पुलाचे अनेक प्रकार असताSSS त.... पुलाचे अनेक प्रकार असताSSS त.... हे वाक्य अचानकच एखाद्या घंटेसारखं मनात नादावू लागलं. सहजच एक चाळा म्हणून मी, शक्यतो स्वतः पाहिलेले, वेगवेगळे पूल आठवू लागलो. नाहीतर काय, एक गूगल केलं की जगातल्या पुलांची यादी समोर येईल.
हल्ली नवीन पद्धतीनं बांधलेले जे अजस्त्र पूल असतात ना ते बघताना किंवा त्यावरून जाताना छाती दडपते. मग तो सॅन फ्रान्सिस्कोचा प्रसिद्ध 'गोल्डन ब्रिज' असो वा कलकत्त्याचा रवींद्र सेतू वा मुंबईचा नवीन सागरी सेतू असो. कलकत्त्याच्याच जुन्या हावडा ब्रिजची व हरिद्वारच्या लक्ष्मण झुल्याची शानही काही वेगळीच. पुण्याचा नवा पूल म्हणा किंवा सांगलीचा आयर्विन पूल म्हणा, शंभर वर्षं झालेले हे पूल, आजही तंदुरुस्त आहेत. हे पूल बघताना, ते बांधणाऱ्या मंडळींचं कौतुक याशिवाय दुसरा विचारही मनात येत नाही.
काही पूल हे असे आकार, तंत्रज्ञान वगैरेसाठी प्रसिद्ध नसतात, पण त्यांच्याभोवती एक वलय असते. उदा. पुण्याचा लकडी पूल. पूल म्हणून विशेष असं काही नाही. पण पुणेकरांसाठी मात्र त्याचं एक आगळं महत्व आहे. हा पूल केवळ मुठा नदीचे दोन किनारे जोडणारा पूल नव्हे. हा पूल, या बाजूची पुणेरी पेठेतली संस्कृती व त्या बाजूची जिमखाना संस्कृती यांना जोडणारा पूल आहे. आजच्या घडीला पुण्यात अनेक पूल झालेत, पण आजही जुन्या पुणेकरांच्या मनात लकडी पूल ओलांडतानाच्या भावना ह्या वेगळ्या असतात. आणि म्हणूनच 'लकडी पुलाला पाणी लागणं' हा पुणेकरांसाठी एक इव्हेंट असतो.
मला मात्र आवडतात ते कुठलंही नावगाव नसलेले, गावाकडचे छोटे पूल. मग कधी ते छोट्या छोट्या ओढ्यांवर बांधलेले कल्वर्ट असतात, ज्यांच्या कट्टयावर बसून एखादे बंडू आणि बाळू, विडी ओढत, दोन घटका पीकपाण्याच्या, सुखदुःखाच्या गप्पा मारतात. किंवा कधी ते कोकणातले, लाकडी ओंडक्यांचे साकव असतात. आजूबाजूच्या झाडांच्या सावल्यातून, खळखळत वाहणाऱ्या ओढ्याशी, जणू गप्पा मारणारे हे साकव, कधी शाळेत जाणाऱ्या पोरांचा दंगा कौतुकाने बघतात तर कधी पाखाडीतली कलमं बघून परतणाऱ्या म्हाताऱ्यांशी हितगूज करतात. काही पूल हे असतात सामान्य, पण ओलांडायची वेळ आली की छाती दडपते. खूप वर्षांपूर्वी भीमाशंकर शिवनेरी असा एक ट्रेक केला होता. त्यावेळी एक खोल दरी ओलांडण्याकरिता शिडीच्या पुलावरून कसेबसे पलीकडे गेलो होतो. आजूबाजूचे आदिवासी मात्र सामान, पोराबाळांसकट त्यावरून ये जा करत होते. मात्र कसंही असलं तरी हे पूल आजूबाजूच्या संस्कृतीचे भाग असतात.
काही पूल तयार झाल्यानंतर सोय होते पण एखादी आधीची व्यवस्था नष्ट होते. सागरी महामार्गामुळे कोकणातला प्रवास सोपा झाला खरा, पण फेरीबोटींची इकोसिस्टिम नष्ट झाली. केवळ फेरीबोटवाले बेरोजगार झाले म्हणून नाही, तर फेरीची वाट पहाणारे लोक, वाट पहाणारे लोक आहेत म्हणून उघडलेली एखादी चहा विडीची टपरी, एखादी सुके मासे विकणारी कोळीण, त्यांच्यातले संवाद, त्यांच्या सुखदुःखाच्या गप्पा, हे सगळं नष्ट झालं. आमच्या कॉलेजच्या मागेही नदीवर एक छोटा कॉजवे होता. फक्त चालत जाणारे व दुचाक्या यांच्यासाठीच तो होता. तो कॉजवे आमच्या कॉलेजविश्वाचा एक भाग होता. कॉजवेच्या पलीकडच्या बाजूनी बघताना कॉलेज कसं उठून दिसायचं. काही वर्षांनी वाहतुकीच्या सोयीसाठी त्याजागेवर मोठा पूल बांधला गेला आणि आमचं कॉलेजही हरवल्यासारखं झालं. आजही तिथून जाताना कॉलेजकडे लक्ष जातं, पण मनातलं कॉलेजचं चित्र अपुरंअपुरं वाटतं. कॉलेजची मागली बाजू, तो कॉजवे, ती नदी, धुवायला आलेल्या रिक्षा, नदीपात्रातल्या हरळीवर चरणारी भटकी गुरं, हे चित्र मनात तसंच ताजं आहे.
जुने पूल पडत रहातील, नवे पूल बनत रहातील. नवनवीन तंत्रे विकसित होतील. दोन ठिकाणांमधील अंतर कमी करत रहातील. पण माणसामाणसामधे आज जी एक दरी निर्माण झाली आहे, अंतर वाढतही आहे, ती सांधणारे पूल कधी बनवणार आहोत आपण? का दोन भावंडं एकमेकांशी अबोला धरतात? का दोन सक्खे मित्र एकमेकांना कायमचे दुरावतात? का एका मजल्यावरचे दोन शेजारी एकमेकांना ओळखतही नाहीत? का रस्त्यातला अपघात पाहूनही आपण दुर्लक्ष करून पुढे जातो?
दोन माणसांच्या मनामधली दरी ओलांडणारे पूलच जर आपण बांधू शकणार नसलो तर बाकी नुसत्या दोन जागांमधली अंतरं जोडण्याला काय अर्थ आहे?
© मिलिंद लिमये
परवा कुणीतरी चीन मधल्या कुठल्याशा काचेच्या पुलाची क्लिप पाठवली. ती बघता बघता अचानक मला प्राथमिक शाळेतला शेंडेबाईंचा चौथीचा वर्ग आठवला. विषय कुठलाही असो, एखादं गणित घालत असो किंवा भूगोल, शास्त्र, इतिहास यापैकी कशातलं तरी महत्वाचं वाक्य असो, मराठी शुद्धलेखन घातल्याच्या चालीवरच त्या सांगत असत. त्यांच्या त्या सांगण्याच्या पद्धतीची आम्हाला इतकी सवय होती की जर एखादं वाक्य त्यांनी असं तालासुरात सांगितलं नाही तर ते नक्कीच महत्वाचं नसणार असं आम्ही ठरवून टाकलं होतं. एकदा त्यांनी 'उद्या शाळेला सुट्टी आहे बरं का' असं साध्या वाक्यात सांगितलं, त्यावर कुणी काही रिऍक्शनच दिली नाही. जेव्हा त्यांनी परत, 'उद्याSSS शाळेलाSS सुट्टी आSS हे' असं सांगितलं, तेव्हा कुठे आमच्या डोक्यात प्रकाश पडला व आम्ही वर्ग डोक्यावर घेतला.
आज मात्र, पुलाचे अनेक प्रकार असताSSS त.... पुलाचे अनेक प्रकार असताSSS त.... हे वाक्य अचानकच एखाद्या घंटेसारखं मनात नादावू लागलं. सहजच एक चाळा म्हणून मी, शक्यतो स्वतः पाहिलेले, वेगवेगळे पूल आठवू लागलो. नाहीतर काय, एक गूगल केलं की जगातल्या पुलांची यादी समोर येईल.
हल्ली नवीन पद्धतीनं बांधलेले जे अजस्त्र पूल असतात ना ते बघताना किंवा त्यावरून जाताना छाती दडपते. मग तो सॅन फ्रान्सिस्कोचा प्रसिद्ध 'गोल्डन ब्रिज' असो वा कलकत्त्याचा रवींद्र सेतू वा मुंबईचा नवीन सागरी सेतू असो. कलकत्त्याच्याच जुन्या हावडा ब्रिजची व हरिद्वारच्या लक्ष्मण झुल्याची शानही काही वेगळीच. पुण्याचा नवा पूल म्हणा किंवा सांगलीचा आयर्विन पूल म्हणा, शंभर वर्षं झालेले हे पूल, आजही तंदुरुस्त आहेत. हे पूल बघताना, ते बांधणाऱ्या मंडळींचं कौतुक याशिवाय दुसरा विचारही मनात येत नाही.
काही पूल हे असे आकार, तंत्रज्ञान वगैरेसाठी प्रसिद्ध नसतात, पण त्यांच्याभोवती एक वलय असते. उदा. पुण्याचा लकडी पूल. पूल म्हणून विशेष असं काही नाही. पण पुणेकरांसाठी मात्र त्याचं एक आगळं महत्व आहे. हा पूल केवळ मुठा नदीचे दोन किनारे जोडणारा पूल नव्हे. हा पूल, या बाजूची पुणेरी पेठेतली संस्कृती व त्या बाजूची जिमखाना संस्कृती यांना जोडणारा पूल आहे. आजच्या घडीला पुण्यात अनेक पूल झालेत, पण आजही जुन्या पुणेकरांच्या मनात लकडी पूल ओलांडतानाच्या भावना ह्या वेगळ्या असतात. आणि म्हणूनच 'लकडी पुलाला पाणी लागणं' हा पुणेकरांसाठी एक इव्हेंट असतो.
मला मात्र आवडतात ते कुठलंही नावगाव नसलेले, गावाकडचे छोटे पूल. मग कधी ते छोट्या छोट्या ओढ्यांवर बांधलेले कल्वर्ट असतात, ज्यांच्या कट्टयावर बसून एखादे बंडू आणि बाळू, विडी ओढत, दोन घटका पीकपाण्याच्या, सुखदुःखाच्या गप्पा मारतात. किंवा कधी ते कोकणातले, लाकडी ओंडक्यांचे साकव असतात. आजूबाजूच्या झाडांच्या सावल्यातून, खळखळत वाहणाऱ्या ओढ्याशी, जणू गप्पा मारणारे हे साकव, कधी शाळेत जाणाऱ्या पोरांचा दंगा कौतुकाने बघतात तर कधी पाखाडीतली कलमं बघून परतणाऱ्या म्हाताऱ्यांशी हितगूज करतात. काही पूल हे असतात सामान्य, पण ओलांडायची वेळ आली की छाती दडपते. खूप वर्षांपूर्वी भीमाशंकर शिवनेरी असा एक ट्रेक केला होता. त्यावेळी एक खोल दरी ओलांडण्याकरिता शिडीच्या पुलावरून कसेबसे पलीकडे गेलो होतो. आजूबाजूचे आदिवासी मात्र सामान, पोराबाळांसकट त्यावरून ये जा करत होते. मात्र कसंही असलं तरी हे पूल आजूबाजूच्या संस्कृतीचे भाग असतात.
काही पूल तयार झाल्यानंतर सोय होते पण एखादी आधीची व्यवस्था नष्ट होते. सागरी महामार्गामुळे कोकणातला प्रवास सोपा झाला खरा, पण फेरीबोटींची इकोसिस्टिम नष्ट झाली. केवळ फेरीबोटवाले बेरोजगार झाले म्हणून नाही, तर फेरीची वाट पहाणारे लोक, वाट पहाणारे लोक आहेत म्हणून उघडलेली एखादी चहा विडीची टपरी, एखादी सुके मासे विकणारी कोळीण, त्यांच्यातले संवाद, त्यांच्या सुखदुःखाच्या गप्पा, हे सगळं नष्ट झालं. आमच्या कॉलेजच्या मागेही नदीवर एक छोटा कॉजवे होता. फक्त चालत जाणारे व दुचाक्या यांच्यासाठीच तो होता. तो कॉजवे आमच्या कॉलेजविश्वाचा एक भाग होता. कॉजवेच्या पलीकडच्या बाजूनी बघताना कॉलेज कसं उठून दिसायचं. काही वर्षांनी वाहतुकीच्या सोयीसाठी त्याजागेवर मोठा पूल बांधला गेला आणि आमचं कॉलेजही हरवल्यासारखं झालं. आजही तिथून जाताना कॉलेजकडे लक्ष जातं, पण मनातलं कॉलेजचं चित्र अपुरंअपुरं वाटतं. कॉलेजची मागली बाजू, तो कॉजवे, ती नदी, धुवायला आलेल्या रिक्षा, नदीपात्रातल्या हरळीवर चरणारी भटकी गुरं, हे चित्र मनात तसंच ताजं आहे.
जुने पूल पडत रहातील, नवे पूल बनत रहातील. नवनवीन तंत्रे विकसित होतील. दोन ठिकाणांमधील अंतर कमी करत रहातील. पण माणसामाणसामधे आज जी एक दरी निर्माण झाली आहे, अंतर वाढतही आहे, ती सांधणारे पूल कधी बनवणार आहोत आपण? का दोन भावंडं एकमेकांशी अबोला धरतात? का दोन सक्खे मित्र एकमेकांना कायमचे दुरावतात? का एका मजल्यावरचे दोन शेजारी एकमेकांना ओळखतही नाहीत? का रस्त्यातला अपघात पाहूनही आपण दुर्लक्ष करून पुढे जातो?
दोन माणसांच्या मनामधली दरी ओलांडणारे पूलच जर आपण बांधू शकणार नसलो तर बाकी नुसत्या दोन जागांमधली अंतरं जोडण्याला काय अर्थ आहे?
© मिलिंद लिमये
Waah Milind...as usual a treat!
उत्तर द्याहटवाThe way you have bridged the past with the present, bridged different types of bridges, and even your thoughts with readers thoughts, is simply amazing.
When it comes to humans, what i feel is, we need to pull down the walls. The bridge would then be visible. Isn't it?
Yeah. You are right. Walls need to collapse first. Thanks for your comments.
हटवाकाही पूल झाल्याने अंतर कमी न होता वाढत आहे की काय ? असा विचार ब्लॉग वाचून मनात आला.
उत्तर द्याहटवाKa re?
हटवा