पहायला गेलं तर तो होता एक अनामिक. पण खरं सांगायचं तर त्याला अनेक नावं होती. गावातले लोक त्याला कुठल्याही नावानं हाक मारत, पण त्याचं खरं नाव कुणालाच माहीत नव्हतं. कुणाला कशाला, खुद्द त्याला स्वतःलाही त्याचं स्वतःचं नाव माहीत नव्हतं. त्यातल्या त्यात शंकराच्या देवळातल्या गुरवीणबाईंनी ठेवलेलं 'नंदी' हे नाव पॉप्युलर होतं.
नंदी इतका दुर्दैवी मी अद्याप कुठे पाहिला नाहीये. तो डोक्यानं थोडासा कमी होता. म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं तर तो थोडासा 'गतिमंद' होता. गावातल्या जुन्या लोकांना नक्की आठवत होतं की तो धनगरांच्या एका तांड्याबरोबर गावात आला. असेल तेव्हा तीन चार वर्षांचा. तांड्यातल्या मेंढ्यांमागे रानात फिरायचा. किंवा मग बापाचं बोट धरून बाप जाईल तिथं जायचा. सगळ्या गावाला ही बापलेकाची जोडी माहीत पडली होती.
त्याची एक विचित्र सवय होती. मेंढ्यांमागे फिरता फिरता हा पोरगा कुठेही झोपून जायचा. त्या बापाला रोज संध्याकाळी ह्याला येड्याला शोधून आणायचं एक कामंच लागलं होतं. एक दिवस तो तांडा निघून गेला. पण कसा कुणास ठाऊक, हा मागंच राहिला. निघायच्या गडबडीत आईबाप ह्याला विसरले का कुठेतरी झोपला तो सापडलाच नाही का मुद्दाम ह्या येड्या पोराला देवाच्या भरंवशावर गावातच सोडून गेले ते कुणालाच माहीत पडलं नाही. तो तांडाही नंतर परत कधी गावात आला नाही.
धनगराचं पोरगं एकटंच माळावर रडत बसलं. येणारे जाणारे हळहळत होते. त्याच्या आईबापाला शिव्या घालत होते. पण ह्याचं करायचं काय ते कुणालाच कळेना. बरं, काही नावगाव विचारावं तर ह्या पोराला बोलताही येत नव्हतं. जवळजवळ मुकंच होतं. अखेर घाटावरच्या शंकराच्या देवळातल्या गुरवीणबाईंनी त्याला आपल्या घरी आणलं. तशी त्यांना स्वतःची चार पोरं होती. पण राहील चौघात पाचवा म्हणून त्यांनी त्याला आणला.
डोक्यानं कमी असल्यामुळे शाळा शिकायचा प्रश्नच नव्हता. अगदीच 'बैलोबा' म्हणण्यापेक्षा गुरवीणबाई त्याला 'नंदी' म्हणू लागल्या. दिवस असेतसे जात होते. नंदी आता जवळजवळ बारा वर्षांचा झाला होता. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तो गावभर फिरत असे. डोक्यानं कमी असला तरी मदतीला पुढे असायचा. कुठे कुणाला गुरं हाकायला मदत कर, कुणा हातगाडीवाल्याची गाडी ढकल, कुणाला लाकडं फोडून दे, कुणाला कडबा उतरवायला मदत कर, अशी कामं तो करू लागे. त्या बदल्यात दोन घास मिळत, त्यातच त्याचं भागायचं. क्वचित कुणीतरी चार आठ आणे त्याच्या हातावर ठेवे. त्याचं काय करायचं हेच त्याला माहीत नव्हतं. सरळ गुरवीणबाईंकडे आणून द्यायचा. ह्या असल्या कामसू गुणामुळे सगळ्यांना तो हवा असायचा. एक होतं मात्र. बोलता येत नसलं तरी काम करताना काहीतरी गुणगुणत असायचा.
गावात कधी धनगर येत, कधी तमाशाचा फड येई, कधी लमाणांचा तांडा येई. हे सगळे नदीपलीकडच्या माळावर मुक्कामाला उतरत. असं कधी कुणी आलं की नंदी सारखा तिकडे जा ये करायचा. प्रत्येक तंबूत, झोपडीत डोकावून बघायचा. बहुधा त्याच्या आईबापाला, शोधत असायचा.
एकदा त्याला एका तांड्यावर कुठलीतरी फोटोफ्रेम मिळाली. तीच सारखी छातीशी धरून फिरू लागला. गावातल्या पोरांना त्या फ्रेमचं फार कुतूहल. पोरांनाच कशाला गावातल्या प्रत्येकालाच ती फ्रेम कशाची आहे ते बघायची उत्सुकता होती. सारखे ह्याच्या मागे लागले की फोटोत काय आहे दाखव. हा पठ्ठ्या काहीकेल्या दाखवत नसे. एकदा मात्र पोरांनी ठरवलं की आज काहीही करून तो फोटो बघायचाच. सगळ्यांनी कट करून नंदीला पकडला. पण नंदीही काटक होता. त्यानं पोरांच्या तावडीतून सुटका करून घेतली व ती फ्रेम छातीशी धरून रानात पळत सुटला. पोरांनी थोडावेळ त्याचा माग काढला, पण नंतर कंटाळून नाद सोडून दिला.
तो कुठे गेला ते कुणालाच कळेना. गुरवीणबाई त्याची चौकशी करत गावातल्या प्रत्येक घरात फिरून आली. ज्या बाजूला तो पळाला होता त्या बाजूला पण लांबवर जाऊन आली. पण नंदी काही सापडला नाही. उरावर धोंडा ठेवूनच गुरवीणबाई माघारी फिरली. सगळा गाव नंदीसाठी हवालदिल झाला.
दोन दिवसांनी सुताराचा रामा ओरडत आला की त्या बाजूच्या एका विहीरीत नंदी तरंगतोय. सगळे धावले. छातीशी फ्रेम धरलेला नंदीचा देह विहीरीत तरंगत होता. बहुधा त्यादिवशी पोरांच्या तावडीतून सुटून पळताना विहीरीत पडला असावा. गुरवीणबाईच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. चार जणांनी त्याला बाहेर काढला. एकानी छातीशी घट्ट धरलेली फ्रेम सोडवून काढली. फ्रेममधलं चित्र बघताच सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला.
फ्रेममधे चित्र होतं बापाच्या बोटाला धरून चालत जाणाऱ्या एका लहानग्याचं....
नंदी इतका दुर्दैवी मी अद्याप कुठे पाहिला नाहीये. तो डोक्यानं थोडासा कमी होता. म्हणजे आजकालच्या भाषेत सांगायचं तर तो थोडासा 'गतिमंद' होता. गावातल्या जुन्या लोकांना नक्की आठवत होतं की तो धनगरांच्या एका तांड्याबरोबर गावात आला. असेल तेव्हा तीन चार वर्षांचा. तांड्यातल्या मेंढ्यांमागे रानात फिरायचा. किंवा मग बापाचं बोट धरून बाप जाईल तिथं जायचा. सगळ्या गावाला ही बापलेकाची जोडी माहीत पडली होती.
त्याची एक विचित्र सवय होती. मेंढ्यांमागे फिरता फिरता हा पोरगा कुठेही झोपून जायचा. त्या बापाला रोज संध्याकाळी ह्याला येड्याला शोधून आणायचं एक कामंच लागलं होतं. एक दिवस तो तांडा निघून गेला. पण कसा कुणास ठाऊक, हा मागंच राहिला. निघायच्या गडबडीत आईबाप ह्याला विसरले का कुठेतरी झोपला तो सापडलाच नाही का मुद्दाम ह्या येड्या पोराला देवाच्या भरंवशावर गावातच सोडून गेले ते कुणालाच माहीत पडलं नाही. तो तांडाही नंतर परत कधी गावात आला नाही.
धनगराचं पोरगं एकटंच माळावर रडत बसलं. येणारे जाणारे हळहळत होते. त्याच्या आईबापाला शिव्या घालत होते. पण ह्याचं करायचं काय ते कुणालाच कळेना. बरं, काही नावगाव विचारावं तर ह्या पोराला बोलताही येत नव्हतं. जवळजवळ मुकंच होतं. अखेर घाटावरच्या शंकराच्या देवळातल्या गुरवीणबाईंनी त्याला आपल्या घरी आणलं. तशी त्यांना स्वतःची चार पोरं होती. पण राहील चौघात पाचवा म्हणून त्यांनी त्याला आणला.
डोक्यानं कमी असल्यामुळे शाळा शिकायचा प्रश्नच नव्हता. अगदीच 'बैलोबा' म्हणण्यापेक्षा गुरवीणबाई त्याला 'नंदी' म्हणू लागल्या. दिवस असेतसे जात होते. नंदी आता जवळजवळ बारा वर्षांचा झाला होता. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तो गावभर फिरत असे. डोक्यानं कमी असला तरी मदतीला पुढे असायचा. कुठे कुणाला गुरं हाकायला मदत कर, कुणा हातगाडीवाल्याची गाडी ढकल, कुणाला लाकडं फोडून दे, कुणाला कडबा उतरवायला मदत कर, अशी कामं तो करू लागे. त्या बदल्यात दोन घास मिळत, त्यातच त्याचं भागायचं. क्वचित कुणीतरी चार आठ आणे त्याच्या हातावर ठेवे. त्याचं काय करायचं हेच त्याला माहीत नव्हतं. सरळ गुरवीणबाईंकडे आणून द्यायचा. ह्या असल्या कामसू गुणामुळे सगळ्यांना तो हवा असायचा. एक होतं मात्र. बोलता येत नसलं तरी काम करताना काहीतरी गुणगुणत असायचा.
गावात कधी धनगर येत, कधी तमाशाचा फड येई, कधी लमाणांचा तांडा येई. हे सगळे नदीपलीकडच्या माळावर मुक्कामाला उतरत. असं कधी कुणी आलं की नंदी सारखा तिकडे जा ये करायचा. प्रत्येक तंबूत, झोपडीत डोकावून बघायचा. बहुधा त्याच्या आईबापाला, शोधत असायचा.
एकदा त्याला एका तांड्यावर कुठलीतरी फोटोफ्रेम मिळाली. तीच सारखी छातीशी धरून फिरू लागला. गावातल्या पोरांना त्या फ्रेमचं फार कुतूहल. पोरांनाच कशाला गावातल्या प्रत्येकालाच ती फ्रेम कशाची आहे ते बघायची उत्सुकता होती. सारखे ह्याच्या मागे लागले की फोटोत काय आहे दाखव. हा पठ्ठ्या काहीकेल्या दाखवत नसे. एकदा मात्र पोरांनी ठरवलं की आज काहीही करून तो फोटो बघायचाच. सगळ्यांनी कट करून नंदीला पकडला. पण नंदीही काटक होता. त्यानं पोरांच्या तावडीतून सुटका करून घेतली व ती फ्रेम छातीशी धरून रानात पळत सुटला. पोरांनी थोडावेळ त्याचा माग काढला, पण नंतर कंटाळून नाद सोडून दिला.
तो कुठे गेला ते कुणालाच कळेना. गुरवीणबाई त्याची चौकशी करत गावातल्या प्रत्येक घरात फिरून आली. ज्या बाजूला तो पळाला होता त्या बाजूला पण लांबवर जाऊन आली. पण नंदी काही सापडला नाही. उरावर धोंडा ठेवूनच गुरवीणबाई माघारी फिरली. सगळा गाव नंदीसाठी हवालदिल झाला.
दोन दिवसांनी सुताराचा रामा ओरडत आला की त्या बाजूच्या एका विहीरीत नंदी तरंगतोय. सगळे धावले. छातीशी फ्रेम धरलेला नंदीचा देह विहीरीत तरंगत होता. बहुधा त्यादिवशी पोरांच्या तावडीतून सुटून पळताना विहीरीत पडला असावा. गुरवीणबाईच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. चार जणांनी त्याला बाहेर काढला. एकानी छातीशी घट्ट धरलेली फ्रेम सोडवून काढली. फ्रेममधलं चित्र बघताच सगळ्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला.
फ्रेममधे चित्र होतं बापाच्या बोटाला धरून चालत जाणाऱ्या एका लहानग्याचं....
Speechless
उत्तर द्याहटवाNa bolata barach kaahi saangun gela.....
Sundar varnan. Ekdam emotional end
उत्तर द्याहटवाअसा नंदी प्रत्येकाला भेटतो. मला भेटलेल्या नंदीच नाव होत बबन. नावाला साजेसा....हरकाम्या पण चुणचुणीत पणा नावाला सुद्धा नाही. पण कोणत्याही कामाला मागे हटणार नाही. काही वर्षांनी त्याच्या घरच्यांनी घर बदलले आणि कुठेतरी लांब निघून गेला. पण नंदी इतका लांब गेला नसेल अशी आशा आहे
उत्तर द्याहटवा