मुख्य सामग्रीवर वगळा

कोविडेच्छा बलियसी

परीक्षा झाली ना की आम्ही सगळे मित्र नाईट आउट करणार आहोत - बरं बाबा

परीक्षा संपली की आधी ती सगळी रद्दी घालून ये - हो गं आई

बाबा, सुट्टी लागल्या लागल्या मी आधी लायसन्स काढणारे बरं का - हं

लायसन्स मिळाल्यावर मी सगळ्या गाड्या चालवणार हां - लायसन्स तर काढ आधी

मी काकाकडे राहायला जाणार आहे - बरं

ह्या सुट्टीत गोव्याला जाऊया का - चालेल

मी आणि माझा मित्र रोज सकाळी सायकल राईडला जाणार आहोत - अरे वा

ह्यावेळेस एक पेटीतरी मार्केट यार्डातून आणूयात - बघू

ह्याची परीक्षा झाली ना की मी निगडीच्या मैत्रिणीकडे जाणारे दोन दिवस राहायला. तिचा बंगला आहे ना. आम्ही पापड, कुरडया, पापड्या वगैरे करणार आहोत - दोन का तीन दिवस जा

चिरंजीवांची ह्यावर्षी बारावी होती. तसा कॉमर्सला असल्यामुळे टक्केवारी, प्रॅक्टिकल्स, सीईटी असल्या कुठल्याही गोष्टींचा ससेमिरा नव्हता. चिरंजीव अभ्यासही मनापासून करतात. मार्क्सही बरे, अगदी चारचौघात सांगण्यासारखे पाडतात. त्यामुळे बारावी असण्याचे हे करा किंवा  करू नका, अशा स्वरूपाचे बंधन फारसे नव्हते. पण तरीही बारावी असल्यामुळे लोकलज्जेस्तव का होईना आम्ही बरेच कार्यक्रम 'तुझी परीक्षा झाली की...' ह्या सदरात टाकले होते. शिवाय 'नेमेचि येतो मग तो उन्हाळा' ह्या प्रकारचेही कार्यक्रम ठरले होते.

आज जवळजवळ दीड महिना झाला...

परीक्षा संपून, सुट्ट्या लागून, उन्हाळा सुरू होऊन...

अजून लायसन्स काढायला झालंच नाहीये...

नाईट आउट कसलं करायला मिळतंय...

गोव्याला जायची तारीखच ठरत नाहीये...

मार्केट यार्ड सोडा, आंबेच खायला मिळतील की नाही कोण जाणे...

असो....

शेवटी काय? कोविडेच्छा बलियसी....


© मिलिंद लिमये 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

मुस्कान

आज अनेक महिन्यांनी जुन्या ऑफिसच्या बाजूला जाणं झालं. सिग्नलला एक छोटं पोरगं लोखंडी रिंगमधून आत बाहेर व्हायचा खेळ करत होतं. मी सहजच ती कुठे दिसत्येय का ते बघू लागलो. खूप पूर्वी माझ्या रोजच्या यायच्या जायच्या रस्त्यावर एका सिग्नलला ती दिसायची. तिच्या लहान भावाबरोबर लोखंडी रिंगच्या साहाय्यानं काही खेळ करून दाखवायची. रस्त्याच्या कडेला तिची आई, असेल विशीबाविशीची, ढोलकं वाजवत बसलेली असायची. ही सुद्धा फार मोठी नव्हती. आठ दहा वर्षांचीच होती. इतर लोकांकडे पैसे मागायची, पण माझ्याकडे कायम प्यायला पाणी मागायची. एकदा हे माहीत पडल्यानंतर मीही आवर्जून एखादी बाटली जवळ ठेवायचो व तिला देऊन टाकायचो. कधीमधी एखादा बिस्किटाचा पुडा द्यायचो. काळीसावळी होती पण दात मात्र पांढरेशुभ्र, एखाद्या टूथपेस्टच्या जाहिरातीतल्या सारखे होते. पाणी दिल्यावर मनापासून हसायची आणि थँक यू हं काका असं म्हणून पुढे जायची. तिचं ते निर्व्याज हसणं खरंच लोभसवाणं होतं.  मधल्या काळात तिचं नाव मुस्कान आहे असं कुणीतरी सांगितलं. आम्ही नवीन ऑफिस घेतल्यानंतर त्या रस्त्यावरून येणं जाणं संपलं. मधे एकदा तिकडे गेलो असता भेटली होती. त्याही वेळी मला

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस