परीक्षा झाली ना की आम्ही सगळे मित्र नाईट आउट करणार आहोत - बरं बाबा
परीक्षा संपली की आधी ती सगळी रद्दी घालून ये - हो गं आई
बाबा, सुट्टी लागल्या लागल्या मी आधी लायसन्स काढणारे बरं का - हं
लायसन्स मिळाल्यावर मी सगळ्या गाड्या चालवणार हां - लायसन्स तर काढ आधी
मी काकाकडे राहायला जाणार आहे - बरं
ह्या सुट्टीत गोव्याला जाऊया का - चालेल
मी आणि माझा मित्र रोज सकाळी सायकल राईडला जाणार आहोत - अरे वा
ह्यावेळेस एक पेटीतरी मार्केट यार्डातून आणूयात - बघू
ह्याची परीक्षा झाली ना की मी निगडीच्या मैत्रिणीकडे जाणारे दोन दिवस राहायला. तिचा बंगला आहे ना. आम्ही पापड, कुरडया, पापड्या वगैरे करणार आहोत - दोन का तीन दिवस जा
चिरंजीवांची ह्यावर्षी बारावी होती. तसा कॉमर्सला असल्यामुळे टक्केवारी, प्रॅक्टिकल्स, सीईटी असल्या कुठल्याही गोष्टींचा ससेमिरा नव्हता. चिरंजीव अभ्यासही मनापासून करतात. मार्क्सही बरे, अगदी चारचौघात सांगण्यासारखे पाडतात. त्यामुळे बारावी असण्याचे हे करा किंवा करू नका, अशा स्वरूपाचे बंधन फारसे नव्हते. पण तरीही बारावी असल्यामुळे लोकलज्जेस्तव का होईना आम्ही बरेच कार्यक्रम 'तुझी परीक्षा झाली की...' ह्या सदरात टाकले होते. शिवाय 'नेमेचि येतो मग तो उन्हाळा' ह्या प्रकारचेही कार्यक्रम ठरले होते.
आज जवळजवळ दीड महिना झाला...
परीक्षा संपून, सुट्ट्या लागून, उन्हाळा सुरू होऊन...
अजून लायसन्स काढायला झालंच नाहीये...
नाईट आउट कसलं करायला मिळतंय...
गोव्याला जायची तारीखच ठरत नाहीये...
मार्केट यार्ड सोडा, आंबेच खायला मिळतील की नाही कोण जाणे...
असो....
शेवटी काय? कोविडेच्छा बलियसी....
© मिलिंद लिमये
परीक्षा संपली की आधी ती सगळी रद्दी घालून ये - हो गं आई
बाबा, सुट्टी लागल्या लागल्या मी आधी लायसन्स काढणारे बरं का - हं
लायसन्स मिळाल्यावर मी सगळ्या गाड्या चालवणार हां - लायसन्स तर काढ आधी
मी काकाकडे राहायला जाणार आहे - बरं
ह्या सुट्टीत गोव्याला जाऊया का - चालेल
मी आणि माझा मित्र रोज सकाळी सायकल राईडला जाणार आहोत - अरे वा
ह्यावेळेस एक पेटीतरी मार्केट यार्डातून आणूयात - बघू
ह्याची परीक्षा झाली ना की मी निगडीच्या मैत्रिणीकडे जाणारे दोन दिवस राहायला. तिचा बंगला आहे ना. आम्ही पापड, कुरडया, पापड्या वगैरे करणार आहोत - दोन का तीन दिवस जा
चिरंजीवांची ह्यावर्षी बारावी होती. तसा कॉमर्सला असल्यामुळे टक्केवारी, प्रॅक्टिकल्स, सीईटी असल्या कुठल्याही गोष्टींचा ससेमिरा नव्हता. चिरंजीव अभ्यासही मनापासून करतात. मार्क्सही बरे, अगदी चारचौघात सांगण्यासारखे पाडतात. त्यामुळे बारावी असण्याचे हे करा किंवा करू नका, अशा स्वरूपाचे बंधन फारसे नव्हते. पण तरीही बारावी असल्यामुळे लोकलज्जेस्तव का होईना आम्ही बरेच कार्यक्रम 'तुझी परीक्षा झाली की...' ह्या सदरात टाकले होते. शिवाय 'नेमेचि येतो मग तो उन्हाळा' ह्या प्रकारचेही कार्यक्रम ठरले होते.
आज जवळजवळ दीड महिना झाला...
परीक्षा संपून, सुट्ट्या लागून, उन्हाळा सुरू होऊन...
अजून लायसन्स काढायला झालंच नाहीये...
नाईट आउट कसलं करायला मिळतंय...
गोव्याला जायची तारीखच ठरत नाहीये...
मार्केट यार्ड सोडा, आंबेच खायला मिळतील की नाही कोण जाणे...
असो....
शेवटी काय? कोविडेच्छा बलियसी....
© मिलिंद लिमये
भारीच नकोसे पण अपरिहार्य
उत्तर द्याहटवासगळीकडे हीच रडा रड. बरोबर निरीक्षण
उत्तर द्याहटवाअति उत्तम. इश्वर कोणत्या रुपात येइल काय सान्गावे.
उत्तर द्याहटवाNailaaj ko kya ilaaj
उत्तर द्याहटवाKhara ahe. Kay Kay plans Kele hote poranni pan....
उत्तर द्याहटवा