मुख्य सामग्रीवर वगळा

दिवास्वप्न

'पितृकृपा' नावाचा भला मोठा बंगला होता त्याचा. शिसवी देव्हारा असलेल्या देवघरातल्या विविध देवांना नमस्कार करून तो निघाला. तितक्यात बायकोनं केशरी दूध आणलं. ते पिता पिता तिच्याशी जुजबी काही बोलून तो बाहेर पडला. दारात पांढरीशुभ्र, चार बांगड्यावाली ऑडी उभी होती. रुबाबात ड्रायव्हर शेजारच्या सीटवर बसून त्यानं हातातल्या महागड्या मोबाईलवरून कुणा कार्यकर्त्याला फोन लावला. यावेळच्या इलेक्शनला त्याला आमदारकीचा चान्स होता.

ही सगळी किमया होती वांग्यांची. मागल्या मोसमात त्यानं त्याच्या दहा एकरात वांगी लावली होती. त्याचे त्याला जवळपास एकशे दहा कोटी मिळाले होते. त्याच बळावर हे सगळं जुळून येणार होतं... 

अचानक गाडीला जोरदार गचका बसला...

दचकून त्यानं पाहिलं तर मुकादमानं कमरेत लाथ घातली होती व तो ओरडत होता, XXX ऊठ. झोपा काय काढतो? ती खोकी काय तुझा बाप उचलणार आहे का?  

त्यानं हताशपणे फडका खांद्यावर टाकला व ज्या जमिनीवर त्याच्या बापजाद्यांनी पोटापुरती पिकं काढली होती त्याच जमिनीवर उभ्या राहिलेल्या कारखान्यातली खोकी उचलायला चालू लागला... 


Ⓒ मिलिंद लिमये

टिप्पण्या

  1. भयानक दिवास्वप्न! पण वास्तव तर याहून भयाण आहे. पेकाटात लाथ बसली तरी, स्वप्नातून बाहेर यायची मानसिकताच नाही. एक सिरीयल संपून पुढची सुरु व्हावी.... किंवा आजच्या एपिसोडमध्ये जाग आली तरी उद्या नवा एपिसोड सुरूच... दिवास्वप्न तेच... आजच्या एपिसोडमध्ये सासू दुष्ट तर उद्या नणंद... पुढील दिवास्वप्न तसेच
    सुरु. या काळ झोपेतून जाग येणार का? यांचे करते करविते त्यांना पुन्हा अफूची गोळी देऊन झोपवणार ...सर्वार्थाने!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत