मुख्य सामग्रीवर वगळा

व्रतवैकल्ये : एक विस्तार

सुमारे महिन्यापूर्वी मी 'व्रतवैकल्ये : एक विपर्यास' या मथळ्याचा ब्लॉग लिहिला होता.  यात पत्री गोळा करण्याच्या पद्धतीबद्दल मी माझी मते व्यक्त केली होती. त्यावर अनेक प्रतिक्रिया पण आल्या. पण त्यातून मूळ विषयाचे निराकरण झाले नव्हते. परवा माझ्या एका ग्रुपमधील श्री. सुधीर लिमये यांनी एक माहीती फॉरवर्ड केली, ज्यातून कदाचित थोडीफार उकल होईल असे वाटते. आधीचा ब्लॉग या लिंकवर वाचा.

https://chamanchidi.blogspot.com/2018/08/blog-post_9.html

एकवीस पत्री..

आषाढ श्रावण मनोमिलन, पत्री पुष्प संमेलन।

1) तुळस मंजिरी गोजिरी, प्राणवायू दायिनी।

2) श्वेत दुर्वा..हरित दुर्वा, चर्मरोगांना म्हणती दूर व्हा.।

3) कुंतल पोषक रस माका, त्याला कधी दूर सारू नका।

4) बेल.
डावे पान ब्रह्माचे, उजवे पान विष्णू चे, पण त्रिदल करी नाश त्रिदोषांचे।

5) बोर..बदरी..
ओकारी, उमासे मळमळ अंतरी, सेवन करावी नटखट बदरी।

6)धोतरा..
   . गुंगी आणतो हा धोतरा, जनहो जरा जपून वापरा।

7) पिंपळ..
     कावीळ, वाचा दोषांवर गुणकारी, सदैव सळसळ, जणू वाजवी बासरी।

8) मधुमालती..
  . नाजूक गुलाबी मधुमालती, गुडघे, सांधे रक्षती।

9) शमी..
   पावसाळ्यातील अपचन, शमी चे रस प्राशन।

10) आघाडा..
       दातात कीड, पोटात बिघाडा, सहज,धावून येईल आघाडा।

11) डोरली..

   .   बलदायक, क्षुधावर्धक डोरली, भादव्यात बहरली।

12) कण्हेर..
     कुष्ठरोग, जूनाट इसब, यांनी त्रस्त? लावा कण्हेर मूळ उगाळून मस्त।

13) रुई..
    .  रुई अर्क लेप लावा, डोकेदुखी पळवून लावा।

14) अर्जुन.. सादडा..

      तालबद्ध ठेवा ह्रदय स्पंदन, सांगतसे वृक्ष अर्जुन।

15) विष्णूकांत..
      साक्षात विष्णू कांत, मेंदू बलवर्धक जबरदस्त।

16) डाळिंब..
       रक्तवर्धक रस पत्र, उपयुक्त सर्वत्र।

17) मरवा..
       सुगंधी रस मरवा, चर्मरोगांवर बरवा।

18) देवदार..
      अतिरिक्त वजन वाढीवर, उपयुक्त देवदार।

19) जाई...
       सेवन करा जाई, दृष्टी तीक्ष्ण होई।

20) केतकी..
       डोकेदुखीवर रामबाण, केतकीचे सुवर्णपान।

21) आगस्ती..
     .  सर्दीवर हमखास, आगस्तीचा सहवास।

*एकवीस पत्रींचे करूनी संवर्धन, श्री गणरायांचे करुया पूजन।।

आता कदाचित कुमारीकांना पत्री गोळा करायला का पाठवत त्याचा उलगडा झाल्यासारखे वाटते आहे.

© Milind Limaye
© chamanchidi.blogspot.com

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुरारीलाल भेटत रहायलाच हवाय...

राजेश खन्नानं गाजवलेली आनंद चित्रपटातली मुरारीलालची प्रॅन्क सगळ्यांना माहीत असेल. रस्त्यानं आपल्या मार्गानं जाणाऱ्या कुणालाही मागून जाऊन पाठीवर थाप मारायची व क्यू मुरारीलाल, भूल गये बच्चू? असं विचारून पूर्ण कन्फ्यूज करून टाकायचं असा हा त्याचा उद्योग असतो. एका प्रसंगी अमिताभ त्याला हटकतो की अरे जरा खात्री तरी करून घे की खरंच तो माणूस मुरारीलाल आहे की नाही. त्यावर ह्याचं उत्तर असं की मुरारीलाल नावाच्या कुणाही माणसाला मी ओळखत नाही. आता कन्फ्यूज व्हायची पाळी असते अमिताभची. त्यावर पुढे असं मजेशीर लॉजिक देतो की प्रत्येक माणूस हा एक ट्रान्समीटर आहे. प्रत्येकाच्या अंगातून अशी एखादी लहर उमटते, जी कळत नकळत आपण पकडत असतो. वाटतं की याच्याशी बोलावं, याला हात लावून पहावा. काहीवेळा प्रथमच भेटलेल्या एखाद्याबद्दल आपल्याला वाटतं की याच्याशी आपली खूप जुनी ओळख आहे तर कधी कधी काहीही कारण नसताना एखादा माणूस आपल्याला आवडत नाही. विचारांती हे लॉजिक आपल्याला पटूनही जातं. अखेरीस इसाभाई (जॉनी वॉकर) च्या रूपात त्याला सव्वाशेर भेटतो, जो त्याला उलट अरे जयचंद, कहाँ गायब थे इतने दिन म्हणत मात देतो.  हा चित्रपट माझा अत

गण्या

गण्या ही कोणी अमुक एक व्यक्ती नाही. ही एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी जमात आहे. ही जमात आपल्या आजूबाजूला सर्वत्र वावरत असते. मध्यम किंवा सडपातळ बांधा, कुठल्याही रंगाचा एखादा चौकड्यांचा किंवा रेघारेघांचा शर्ट, शक्यतो मॅचिंग पॅन्ट, पायात कुठल्याही चपला अथवा सँडल्स, हातात एखादी पाऊच किंवा पाठीवर अर्धवट लटकवलेली सॅक, दुसऱ्या हातात सतत वाजणारा मोबाईल व चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास ही या गण्या लोकांची ओळख. हा प्रचंड आत्मविश्वास अनेकवेळा आगाऊपणाची पुसट रेषाही ओलांडतो. बहुतेक सर्व गण्या लोक टू व्हीलरच वापरतात. म्हणजे घरी तशी चारचाकी असते. पण त्यांच्या 'आला गेला मनोगती' पद्धतीच्या वावरण्यासाठी चारचाकी संपूर्णपणे अयोग्य असते.  पुलंच्या तीन वल्ली या एका व्यक्तिरेखेमधे थोड्या थोड्या अंशाने सामावलेल्या असतात. पुलंच्या 'तो' प्रमाणे यांचा सर्वत्र प्रादुर्भाव किंवा सुळसुळाट असतो. बापू काणेप्रमाणे कुठल्याही कामाचा प्रचंड उरक आणि उत्साह असतो. आणि परोपकारी गंपू प्रमाणे डेक्कन जिमखाना ते वज्रदेही मंडळापर्यंत कुठेही वावर असतो.  तसा एखादा गण्या बँकेत असतो, एखाद्या गण्याचा काही व्यवसाय अस

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत