मुख्य सामग्रीवर वगळा

तिची गाणी, त्याची गाणी - वहीदा रहमान

वहीदा रहमान ही एक अतिशय सशक्त समर्थ अभिनेत्री होती, आजही आहे. यात कुठलेही दुमत असायचे कारण नाही. गाइड मधली रोझी असो, खामोषी मधली नर्स असो किंवा तीसरी कसम मधली हीराबाई असो, वहीदाने ह्या भूमिका अमर करून ठेवल्या आहेत. एक अतिशय ग्रेसफुल पण तितकीच मर्यादाशील अशी ही अभिनेत्री. कुठल्याही चित्रपटातील कुठलीही भूमिका घ्या. वहीदाने कधीही, कुठेही चीप वागल्याचे वा दिसल्याचे आठवणार नाही. तोच डौल, तोच संयमी अभिनय, तीच १००% देण्याची वृत्ती. तीसरी कसम मधे ती हिराबाई दिसते, गाइड मधे रोझी वाटते, बीस साल बाद मधे गांव की छोरी म्हणून कुठेही कमी पडत नाही आणि देल्ही 6 मधे आजी म्हणूनही शोभते. नो वंडर, तिच्या अनेक भूमिका गाजल्या. जो अभिनय संवाद बोलताना तोच अभिनय गाताना. आणि त्यामुळेच 'तिची गाणी' आठवणे आपल्यासाठी मस्ट आहे.

पहिल्या प्रथम आठवते ते सी आय डी मधले 'कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना' हे तिचे तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटातील गाणे. त्याआधी तिने - तेलुगू चित्रपटात नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. पण ह्या चित्रपटात तिचा रोल दुय्यम नकारात्मक असा होता. पहिल्याच चित्रपटात नकारात्मक भूमिका करायला तिने बिलकुल मागेपुढे पाहीले नाही. गाणे जसे जसे पुढे सरकत जाते, तसतसे वहीदाचे भाव ही बदलत जातात. आधी असणारा अवखळपणा, जसजसा तो खलनायक काठी टेकत टेकत, पुढे पुढे येत जातो, तसतसा काळजी आणि तगमग यामधे बदलत जातो. त्याच्यापासून लांब असताना काळजी दिसते, पण त्याला भुलवताना मात्र पूर्ण अवखळपणा. क्या बात है... आणि शेवटी 'उड जा रे पन्छी, शिकारी है दिवाना' म्हणताना, देव आनंद भुयारात शिरतो तेंव्हा 'हुश्श' झाल्याचा अभिनय तर लाजवाब....

नंतर मला आवडते ते 'बीस साल बाद' मधले, 'जरा नजरों से कह दो जी' हे गाणे. खरं म्हणजे ह्या गाण्यातले, गायक हेमंतकुमारचे जे गद्य बोल आहेत ना, त्यांची आम्ही एकेकाळी यथेच्छ टिंगल करत असू. पण त्याच वेळी त्या गाण्यातील प्रत्येक शब्दाला साजून दिसणारी वहीदा मात्र अवश्य लक्षात राहात असे. पुढले शब्द बघा...

ये भोलापन तुम्हारा, ये शरारत और ये शोखी
ज़रूरत क्या तुम्हें तलवार की तीरों की खंजर की
नज़र भर के जिसे तुम देखो वो खुद ही मर जाए

शकील बदायुनी यांच्या शब्दांनी पुरेपूर न्याय दिलाय वहीदाला.

बरं ह्या गाण्यात टिपिकल 'गांव की छोरी' टाईपची भूमिका होती, तर गाइड मधे एकदम मॉडर्न रोझीची. वयाने बर्यापैकी मोठ्या आणि सदैव कामात मग्न असणार्या नवर्यामुळे कुढणारी नंतर राजू गाइड च्या सहवासात खुललेली रोझी, वहीदाने फार मस्त साकारलीय. 'आज फिर जीने की तमन्ना है' ह्या गाण्यात तर ती अक्षरशः 'सुटलीय'.

मैं हूँ गुबार या तूफ़ां हूँ, कोई बताए मैं कहाँ हूँ,
डर है सफ़र में कहीं खो जाऊँ मैं, रस्ता नया..
ह्या ओळी म्हणतानाचा तिचा अभिनय आणि नृत्य अवश्य बघण्यासारखे आहे.

वहीदाच्या कारकीर्दीतील एक लॅंडमार्क म्हणता येईल अशी भूमिका म्हणजे 'तीसरी कसम' मधली 'हिराबाई' ची. हिराबाई ही एक तवायफ (गानेवाली बाई) असते. राज कपूरनी ह्या चित्रपटाची स्टोरी ऐकताच, मीच नायकाची, म्हणजे हिरामणची, भूमिका करणार, असे जाहीर करून टाकले. राज सारख्या बड्या प्रस्थाच्या हट्टापुढे दिग्दर्शक बासू भट्टाचार्य काही करू शकले नाहीत. बापाच्या वयाच्या दिसणार्या नायकाबरोबर वहीदाला काम करावे लागले. अतिशय भावपूर्ण कथा, सुरेख दिग्दर्शन, राज वहीदाचा अप्रतीम अभिनय, एव्हढे सगळे असूनही चित्रपट पडला. शेवटच्या सीन मधे हिरामण धावत धावत तिला शोधत येतो. चल, आपण पळून जाऊन लग्न करू म्हणतो. त्यावेळी हिराबाई एव्हढेच म्हणते, "मैं बिक चुकी हूँ, मितवा". ह्या वाक्याला वहीदाचा आणि वाक्य ऐकल्यावर राजचा अभिनय एकदा बघाच. हेलावून टाकणारा अभिनय. मात्र चित्रपट पडूनसुद्धा त्यातली गाणी आजही ऐकली जातात. ‘पान खाए सैया हमारोह्या गाण्यावर केलेला तिचा एका सराईत गाणारणीचा अभिनय बघा. आणि त्याच गाणारणीचा ' आभी जा, रात ढलने लगी, चांद छुपने चला' असे एका वेगळ्या परिस्थितीत म्हणतानाचा अभिनय पहा. लाजवाब. दुसरा शब्द नाही.

विनवणी, काळजी, लटका राग, अनुराग, प्रीती या अनेक भावनांचे मिश्रण म्हणजे 'मुझे जीने दो' मधले नदी नारे ना जाओ शाम पैया पडू. काय सुरेख भावामुद्रा आहेत वहिदाच्या. गाण्याच्या सुरुवातीला ती विनवते की नदीत जाऊ नको, पुढे म्हणते की जायचे तर जा पण प्रवाहात जाऊ नको. असे करत करत शेवटी निदान सवत तरी आणू नकोस आणि आणलीस तर निदान मला भेटवू नकोस.
उस पारे जो जाओ तो जैबे करो
संग सवतिया लाओ शाम पैयाँ पड़ूँ

संग सवतिया जो लाओ तो जैबे करो
हमसे मिलाओ, शाम, पैयाँ पड़ूँ

ह्या शेवटच्या दोन कडव्यांमधे जे काही भावविभ्रम वहिदाने सादर केलेत ना, ते यूट्यूब वर नक्की बघा. थक्क व्हाल.

अशीच एक तिची माइलस्टोन भूमिका म्हणजे खामोशीमधली नर्सची. नायिका असूनसुद्धा ह्या चित्रपटात वहीदाला एकही गाणे नाही. तीन प्रसिद्ध गाणी. एक राजेशचे, दुसरे धर्मेन्द्रचे, तिसरे तिच्या मैत्रिणीचे. पण तीनही गाण्यांच्यावेळचा वहीदाचा अभिनय मात्र केवळ सुरेख. एका सायकीआट्रिक उपचार करणारया हॉस्पिटल मधली ही नर्स, नर्सिंग करता करता पेशंट च्याच प्रेमात पडते. दोन्ही वेळेला अपयश. त्याच्या स्ट्रेसमुळे अखेर तिलाच एडमिट करावे लागते. वहीदाचा एक सूपर हिट चित्रपटअरूण (राजेश खन्ना) एक कवी, लेखक. मनस्वी अशा या अरूणचा ब्रेक अप झाल्यामुळे त्याच्या मनावर परिणाम झालेला असतो. त्याआधी देवकुमार (धर्मेन्द्र) वर उपचार करताना हिचाही ब्रेक अप झालेला असतो. अशा पार्श्वभूमीवर अरूण गातो.

वो शाम कुछ अजीब थी, ये शाम भी अजीब है
वो कल भी पास पास थी, वो आज भी करीब है

राजेशचा अभिनय तर मस्तच, पण वहीदाचा अतिसुन्दर.

'कभी कभी' मधे वहीदाने अमिताभच्या पत्नीची (अंजली) भूमिका केली आहे. अंजलीला लग्नाआधीच्या प्रेमप्रकरणातून एक मुलगी (नीतू सिंग) असते, जिला पुढे कपूर दांपत्याने (परीक्षित सहानी, सिमी गॅरेवाल) दत्तक घेतलेले असते. योगायोगाने ती अंजलीच्या संपर्कात येते, जिथे अंजलीला कळते की ही आपलीच. अशा परिस्थितीत ती घरी आलेली असताना, अंजली गाते...

मेरे घर आई एक नन्ही परी, एक नन्ही परी
चांदनी के हसीन रथ पे सवार

ह्याच गाण्यात जे शेवटचे कडवे आहे ना, त्या कडव्याचे शब्द वर दिलेल्या बॅकग्राउंड वर पहा. मग कळेल वहीदा म्हणजे काय रसायन होते.

मैने पूछा उसे के कौन है तू, हंसके बोली के मैं हूँ तेरा प्यार
मैं तेरे दिल में थी हमेशा से, घर में आई हूँ आज पहली बार

साहीरच्या शब्दांवर, लताच्या आवाजात, वहीदाचा परफॉर्मन्स एकदा बघाच.

नायिकेच्या भूमिका मिळेनाशा झाल्यानंतर, वहीदा चरीत्र भूमिका करू लागली, आज ही करतेय. ज्या अमिताभची १९७६ मधे (कभी कभी) ती पत्नी होती, त्याच अमिताभची १९७८ मधे (त्रिशूल) ती आई झाली. वागण्यामधली अभिनयामधली ग्रेस मात्र तीच, तशीच राहीली. १९८४ च्या 'मशाल' मधे दिलीपकुमारच्या पत्नीची (सुधा) छोटीशीच, पण सुरेख भूमिका तिने केली. पण आता तिच्या वाट्याला गाणी मात्र येत नव्हती.

अचानक २००९ मधे 'देल्ही 6' मधे अभिषेक बच्चनच्या आजीच्या भूमिकेत ती परत गाताना दिसली. गाणे होते...

सैया छेड देवे, ननद चुटकी लेवे,
ससुराल गेन्दा फूल,
सास गारी देवे, देवर समझा लेवे,
ससुराल गेन्दा फूल,

गाण्यात तसे काहीही खास नाही. पण आजूबाजूला अनेक सुंदर तरुणी असताना देखील, आपले लक्ष खिळून राहते ते फक्त वहीदाकडे.

ह्या गाण्याच्या निमित्ताने जाता जाता वहीदाने एक लाइफ टाइम धडा दिलाय. तो म्हणजे....

म्हातारपणसुद्धा अतिशय ग्रेसफुल असू शकतं...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पक्षी उडोनि जाई...

 वर्षातून दोन वेळा, दर सहा महिन्यांनी, मला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. माझ्या सीएच्या व्यवसायात वर्षातून दोन वेळा, परीक्षा पास झाल्यानंतर मुलं आमच्या ऑफिसमधे आर्टिकलशिपसाठी येतात. तीन वर्षं काम करतात व एक दिवस त्यांची आर्टिकलशिप संपते. आणि हा जो 'एक दिवस' असतो ना तो फार त्रासदायक असतो. आता दर सहा महिन्यांनी इतकी मुलं येतात, तीन वर्षांनी ती जाणारच असतात. मग त्यात इतकं त्रासदायक काय? असा प्रश्न पडूच शकतो. कदाचित असंही असेल की याचा त्रास मलाच होतो.  तो एक दिवस येतो. दोघं तिघं केबिनमधे येतात. काय रे...??? सर, आज आमचा लास्ट डे... आं, संपली तीन वर्षं? हो ना सर. कळलीच नाहीत कशी संपली... त्याचं काय आहे ना, ही जी काही तीन वर्षं असतात ना ती म्हणजे केवळ तीन गुणिले तीनशे पासष्ट इतकाच हिशेब नसतो. आला ऑफिसमधे, गेला क्लायंटकडे, केलं काम, झाली तीन वर्षं असा कोरडा कार्यक्रमही नसतो. बघता बघता एक वेगळा बंध निर्माण करणारी ही तीन वर्षं असतात. पहिल्या दिवशी कोण कुठला माहीतही नसणारा मुलगा, शेवटच्या दिवशी गळ्यातला ताईत झालेला असतो. एखादी मुलगी, एखादी का बहुतेक सगळ्याच, सासरी जाताना रडावं तशी रडत

विस्कटलेला अल्बम

खरं तर फोटोंचा अल्बम बघणं हा एक मस्त टाईमपास असतो. सर्वसाधारणपणे कुठल्याही चांगल्या निमित्तानं कुठे गेल्यानंतर किंवा लोक जमल्यानंतर काढलेले हे फोटो एखाद्या टाईममशीनप्रमाणे आपल्याला भूतकाळात हिंडवून आणतात. मग तो एखादा जुना, कृष्णधवल फोटोंचा अल्बम असो वा एखाद्या मोबाईलमधली गॅलरी.  परवा जवळजवळ अडीच वर्षांनी आफ्रिकेला येणं झालं. गेली अनेक वर्षं इथे येत असल्यामुळे इथे काम करणारे अनेक जण माझे चांगले मित्र आहेत. नेहमीप्रमाणे संध्याकाळी अकाउंट्स, फायनान्स मधल्या लोकांचं गेट टुगेदर ठरलं. मी तिथे गेल्यावर सगळे माझ्याभोवती जमले. बहुतेक चेहरे ओळखीचे होते. काही नवीन चेहरेही होते. काही परिचित चेहरे दिसत नव्हते. पण तिथे असलेल्या प्रत्येक चेहऱ्यावर काही वेगळेच भाव असल्याचा मला भास झाला. वेलकम बॅक टू आफ्रिका, नाईस टू सी यू आफ्टर अ लॉन्ग टाईम वगैरे वाक्य म्हणली गेली.  मात्र ह्या सगळ्या वाक्यांमागचं खरं वाक्य होतं,  हॅपी टू सी यू अलाइव्ह...    कुणी एकानं लेट्स कॅच अप व्हेअर वी लेफ्ट म्हणत मागल्या वेळच्या गेट टुगेदरचा अल्बम लॅपटॉपवर उघडला. परिणाम उलटाच झाला. सगळेच जण गप्प होऊन कुठेतरी हरवल्यासारखे झाले. क

गझलशाळेत डोकावताना

 जे कोणी मला ओळखतात त्यांना आजचे हे शीर्षक वाचून जरा नवलच वाटले असेल. मी आणि गझल? ज्या इसमाचा बडबडगीतांशीही संबंध नाही तो थेट गझलबद्दल काहीतरी कसा काय लिहू शकतो? ही शंका रास्त असली तरी त्याचा दोष माझ्यावर येत नाही. खरं म्हणाल तर बालकवी, कुसुमाग्रज, विंदा, पाडगावकर (अगदी लिज्जत पापडासकट) यांच्या कविता मला आजही आवडतात. ग्रेस, जी ए, यांच्या कविता कधीच कळल्या नाहीत हेही प्रामाणिकपणे मान्य करतो.  पण एकूणच कवितांच्या बाबतीत माझा 'औरंगजेब' करायचं श्रेय माझ्या, मुख्यतः कॉलेजमधल्या, वर्गमित्रांना जातं. कुठल्यातरी मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडायचं, तिला सरळ जाऊन विचारायचं डेरिंग बहुधा नसायचंच. मग यांचा एकतर्फी प्रेमभंग व्हायचा. की झालं, डायरिया झाल्यासारख्या प्रेमभंगाच्या कविता सुरु. फार सावध रहायला लागायचं ह्या प्रेमभंग्यांपासून. चुकून कधी कोणी गाफीलपणे यांच्या हातात सापडला तर तो मुलगा पुढले तीन दिवस कॉलेजला येत नसे. सगळे लेकाचे पुलंच्या नानू सरंजामेछाप कविता पाडायचे. तेच ते, 'मला गिळायचं आहे ब्रह्मांड' किंवा 'मी झोपतो करून हिमालयाची उशी' वगैरे वगैरे. अनेकांच्या कविता ऐकून